© Volody100 | Dreamstime.com

वाक्प्रयोग पुस्तक

अनुवांशिक परिवर्तन बोलणे शक्य करते

© Volody100 | Dreamstime.com
ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

अनुवांशिक परिवर्तन बोलणे शक्य करते

मनुष्य पृथ्वीवरील एकमेव बोलू शकणारा प्राणी आहे. हे त्याला प्राणी आणि वनस्पती पासून वेगळे करते. अर्थात प्राणी आणि वनस्पती देखील एकमेकांशी संवाद साधतात. तथापि, ते किचकट शब्दावयवातील भाषा बोलत नाहीत. परंतु माणूस का बोलू शकतो? बोलण्यासाठी सक्षम होण्याकरिता काही शारीरिक वैशिष्ट्ये आवश्यक आहेत. शारीरिक वैशिष्ट्ये फक्त मानवामध्ये आढळतात. तथापि, याचा अर्थ त्यांना मानवाने अपरिहार्यपणे विकसित केले पाहिजे असे नाही. उत्क्रांतिच्या इतिहासात,कारणाशिवाय काहीही घडत नाही. कोणत्यातरी कालखंडात, मानवाने बोलायला सुरुवात केली. आपल्याला ते अद्याप माहित नाही की ते नक्की केव्हा घडले. परंतु असे काहीतरी घडले असावे ज्यामुळे माणूस बोलू लागला. संशोधकांना अनुवांशिक परिवर्तन जबाबदार होते असा विश्वास आहे. मानववंशशास्त्रज्ञांनी विविध जिवंत प्राण्यांच्या अनुवांशिक सामग्रीचीतुलना केली आहे. भाषणावर विशिष्ट जनुकांचा प्रभाव होतो हे सर्वज्ञ आहे. ज्या लोकांमध्ये ते खराब झाले आहे त्यांना भाषणात समस्या येतात. तसेच ते स्वत:ला व्यक्त करु शकत नाहीत आणि शब्द कमी वेळात समजू शकत नाही. ह्या जनुकांचे मानव,कपि/चिंपांझी आणि उंदीर यांच्यामध्ये परीक्षण करण्यातआले. ते मानव आणि चिंपांझी मध्ये फार समान आहे. केवळ दोन लहान फरक ओळखले जाऊ शकतात. परंतु हे फरक मेंदूमध्ये त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देते. एकत्रितपणे इतर जनुकांसह, ते मेंदू ठराविक क्रियांवर परिणाम घडवितात. त्यामुळे मानव बोलू शकतात तर, चिम्पान्झी बोलू शकत नाहीत. तथापि, मानवी भाषेचे कोडे अद्याप सुटलेले नाही. एकटे जनुक परिवर्तनासाठी उच्चार सक्षम करण्यास पुरेसे नाही. संशोधकांनी मानवी जनुक उंदरामध्ये बिंबवले. ते त्यांना बोलण्याची क्षमता देत नाही. परंतु त्यांचा 'ची ची' आवाज कल्लोळ निर्माण करतो.