© Homocosmicos | Dreamstime.com

वाक्प्रयोग पुस्तक

अलझायमरशी लढण्यासाठी भाषांचा वापर करणे

© Homocosmicos | Dreamstime.com
ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

अलझायमरशी लढण्यासाठी भाषांचा वापर करणे

ज्यांना मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राखायचे आहे त्यांनी भाषा शिकली पाहिजे. भाषा कौशल्य स्मृतिभ्रंशापासून संरक्षण करु शकते. असंख्य वैज्ञानिकांच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. शिक्षणासाठी वय आडवे येत नाही. काय महत्त्वाचे आहे त्याचा मेंदू नियमितपणे वापर करतो. शब्दसंग्रह शिकताना मेंदूचे विविध भाग कार्यरत होतात. हे भाग महत्त्वाचे आकलनविषयक प्रक्रिया नियंत्रित करतात. त्यामुळे, बहुभाषिक लोक अधिक जागृत असतात. त्यांची एकाग्रता देखील चांगली असते. तथापि, बहुभाषिकतेचे अतिरिक्त फायदे आहेत. बहुभाषिक लोक चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यांना जलद निर्णय घेता येतात. कारण, त्यांचा मेंदू निवडण्यासाठी शिकलेला आहे. एका गोष्टीसाठी दोन संज्ञा हे त्याला नेहमी माहित असते. या संज्ञांसाठी व्यवहार्य पर्‍याय आहेत. त्यामुळे, बहुभाषिक लोक सतत निर्णय घेत असतात. अनेक गोष्टींदरम्यान निवडण्याची त्यांच्या मेंदूला सराव असतो. आणि या प्रशिक्षणाचा फायदा फक्त मेंदूच्या भाषण केंद्रालाच होत नाही. बहुभाषिकतेमुळे मेंदूच्या अनेक भागांना फायदा होतो. भाषा कौशल्याचा अर्थसुद्धा चांगले संज्ञानात्मक नियंत्रण ठेवणे हा आहे. अर्थात, भाषा कौशल्य स्मृतिभ्रंश प्रतिबंधित करणार नाही. तथापि, बहुभाषिक लोकांमध्ये रोग हळू पोहोचतो. आणि त्यांच्या मेंदूचा समतोल प्रभाव चांगला सक्षम वाटतो. भाषा शिकणार्‍यांमध्ये स्मृतिभ्रंश लक्षणे कमकुवत स्वरुपात दिसतात. संभ्रम आणि विसरभोळेपणा कमी गंभीर असतात. म्हणून, वयस्कर आणि तरुणांना भाषा संपादनापासून समान फायदा होतो. आणि, प्रत्येक भाषेबरोबर एक नवीन भाषा शिकण्यासाठी तो सोपे करतो. तर मग आपण सर्वांनी औषधाऐवजी शब्दकोशापर्यंत पोहोचले पाहिजे.